Saturday, 18 July 2015

२८ जुन २०१५ वसई एड्वेंचर क्लब बरोबर पावसाळी ट्रेक साठी गंभीरगडावर गेले होते,वर्षातला पहिला ट्रेक असल्यामुळे सभासद संख्या जास्तच होती तब्बल ११९....
पाटीलवाडी या पायथ्याच्या गावापासुन चढायला सुरुवात केली, गडावर मधमाशांची पोळी आहेत त्यामुळे जरा जपावे लागेल अशी सुचनाही मिळाली होती,परंतु गडावर चढायला सुरुवात केली आणि आजुबाजुच्या गावातल्या आदिवासी पोरे पोरींचेच मोहोळ उठल्यासारखे वाटु लागले,माशा घोंघावल्यासारखे ते पुढे मागे घोंघावत होते,मोबाईल वर कर्कश्श आवाजातली गाणी कमी पडत होती म्हणुन की काय त्यांच्याही बेंबीच्या देठापासुन केकलत राहीले,
ट्रेकींग करताना बर्याचदा नवखे ट्रेकर्स असा आरडा ओरडा करतात,दारुकाम आणि दंगा करतात हे ऐकलं आणी बघितलं होतं ह्याउलट तेथील स्थानिक गावकरी मात्र या मुळे त्रासुन गेलेले असतात, टुरिस्ट गडावर कचरा करतात आणी ग्रामस्थ तो साफ़ करतात असं अनेक लेखांमधे बातम्यांमधे वाचलंय पण या वेळेस प्रकार उलटा होता,आमच्या ग्रुप च्या लीडर ने कुठलेही "रंगीत द्रव्य" पदार्थ जवळ बाळगायचे नाहीत अशी सक्त ताकीद दिलेली होती, आणी ह्या "माश्या" प्रत्येक हातात शीतपेये आणी कसली कसली पेये,चकणा अशी सगळी जय्यत तयारी घेउन वर चढत होत्या.
गड अर्धा चढुन वर पोहोचलो आणि निमुळत्या वाटेवर ट्रैफ़िक जैम झाला होता,ट्रेकर्स शिस्तीत ओवरटेक न करता चढत असताना ही मंडळी कशीही घुसत होती आणि इतरांना गोंधळात टाकत होती.....गडावर शांततेच्या शोधात निघालेल्या आम्हाला क्षणभरही शांतता मिळत नवती जिथे पहावे तिथे ही प्रजा आणि त्यांचे कर्कश्श चीत्कार!
गडावरुन दिसणारा खालचा परिसर अतिशय मनोहारी होता पण त्याला गालबोट लागलं होतं ह्यांचं,
गडावरुन खाली उतरताना साहजिकच बाटल्या आणि इतर खाद्यपदार्थांची पाकीटं रिकामी होउन गडावर फ़ेकली जाउ लागली आणि आमच्यातल्या ट्रेकर्स नी ती उचलायला सुरुवात,जवळ जवळ तीन चार पिशव्या कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करुन खालपर्यंत आणल्या.....
महाराष्ट्रातल्या कित्येक गडकिल्ल्यांच्या संरक्षणाची आणि साफ़ साफ़ाईची जवाबदारी तिथल्या गावकर्यांनी स्वीकारली आहे,प्रसंगी बेजवाबदार पर्यटकांचे कानही उपटले आहेत,पण जेव्हा परिस्थिती अशी उलट होते तेव्हा काय करायचं?
मधुवंती गोडसे

No comments:

Post a Comment